आदिवासी कल्याण | थीम 2.0 | आजादी का अमृत महोत्सव, भारत सरकार।

आदिवासी कल्याण

Tribal Development

आदिवासी कल्याण

देशभरात आपला समृद्ध वारसा आणि संस्कृती जतनाच्या कामात आदिवासी समुदायांचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्य चळवळीत या समुदायांचे योगदान काय होते, या संबंधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानात अनेक उपक्रमांतर्गत माहिती प्रसारीत केली जात आहे. त्यांच्या योगदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहचवली जात आहे. 

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात आदिवासींची संख्या १० कोटी ४ लाख आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ८.६ % लोक आदिवासी आहेत. भारताच्या विकास प्रक्रियेत यांचे योगदान लक्षणीय आहे. स्वातंत्र्य चळवळीत, क्रिडा क्षेत्रात आणि व्यवसाय-व्यापारातही या समुदायाने ठसा उमटवला आहे.

  • आदिवासी समुदायातील स्वातंत्र्यसेनानी:  १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती असते. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत आदिवासी समुदायातील नेत्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान तसेच देशाच्या उभारणीतील त्यांचे काम अधोरेखित केले जात आहे. ते संप्रेषित होणे गरजेचे आहे.
  • आदिवासींची स्वतंत्र ओळख जतन: शहरीकरण, नागरिकरणाच्या रेट्यात आदिवासींचे वेगळेपण, सांस्कृतिक पदचिन्ह पुसट होत आहेत. त्यांच्या बोलीभाषा व त्यातील शब्दांचा वापर मागे पडत आहेत. त्यांचा आवर्जून वापर करत त्याला व्यवहारात आणणे गरजेचे आहे. भाषिक वारसा जतनावर विशेष भर दिला जात आहे. 
  • शैक्षणिक विकास: एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) आणि एकलव्य मॉडेल डे बोर्डींग शाळा (EMDBS) या उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासींना शैक्षणिक सुविधा प्रदान केल्या जात आहेत. वर्ष २०२२ च्या अखेरपर्यंत लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. ५० टक्के ST प्रवर्ग आणि किमान २० हजार आदिवासींची संख्या असलेल्या प्रत्येक ब्लॉकमधे एक EMRS सक्रिय असावी. EMRS ची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
  • उद्योजकता विकास: मर्यादित कार्यक्षेत्र व संपर्काच्या कमी संधी यामुळे तसेच शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे अनेक संधींना आदिवासी मुकतात. क्षमता असूनही त्यांना संधी मिळत नाहीत. या दिशेने उपक्रमांत वाढ.  
  • क्रीडा क्षेत्र: दुती चंद (धावपटू), मेरी कोम (मुष्टीयोद्धा), बायचुंग भुतिया (फुटबॉल) , लालरेसियामी (हॉकी), बिरेंद्र लाकडा (हॉकी), दांगमेई ग्रेस (फुटबॉल),थोनाकल गोपी(मॅरेथॉन) इत्यादी क्रीडापटू आदिवासी समुदायातून आले आहेत. यांनी या समुदायातील प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे. एकलव्य शाळांच्या माध्यमातून सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्सची  (CoE for Sports) स्थापना केली जात आहे. मल्लखांब, कलारीयापट्टू, गटका, थांग-ता, योगासने, सिलंबम या देशी क्रीडा व व्यायाम प्रकारांचे संवर्धन व जनत आदीवासी समुदाय करत आला आहे. ही त्यांच्याकडून मिळालेली मोठी देण आहे.

भावी कृतीकार्यक्रमाची दिशा

  • आदिवासी समुदायातील प्रतिभांचा शोध: योग्य संधींसाठी पुढाकार घेणे, मंच उपलब्ध करून देणे तसेच नव्या प्रतिभांना शोधून त्यांना प्रशिक्षित करणे.
  • बोलीभाषा आणि भाषा: UNESCO ने वर्ष २०२२-३२ हे दशक स्थानिक भाषांच्या विकासाचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित केले आहे. बोलीभाषा, प्रादेशिक भाषांचे संवर्धन, त्यांच्या वापरास प्रोत्साहन, लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न, त्या भाषेत लेखन व साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
  • आरोग्य आणि पोषण: आदिवासी समुदायाच्या आरोग्य समस्या, पोषणातील त्रुटी निवारणासाठी अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून काम, यातील नेमके प्रश्न निश्चित करून त्या दिशेने उपक्रमांचे आयोजन.
  • कला आणि संस्कृती: आदिवासी समुदायातील सुप्त संस्कृती व कलांना , परंपरांना जतन करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन. भारतभरात विविध लुप्त होत जाणाऱ्या प्रतिभेला विविध मंचावरून संप्रेषित करणे. 
  • आदिवासी शाळा: औपचारिक आणि अनौपचारीक शिक्षण पद्धतींदरम्यान सांगड घालणे. त्यातून आदिवासींच्या गुणांना अभिव्यक्त करण्यास चालना.
  • आदिवासी स्वातंत्र्यसेनानी: कार्यशाळा, चर्चासत्र, समारंभ, संमेलनांचे आयोजन करून अज्ञात, प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या आदिवासी स्वातंत्र्यसेनानी विषयी माहिती प्रसारीत करणे. अशा उपक्रमांची मालिका विविध ठिकाणी सादर करणे.
  • उपजीविकेसाठी योजना: कौशल्य विकास आणि उपजीविकेची साधने वाढावीत यासाठी उपक्रमांचे आयोजन. आदिवासी समुदायांना व्यापक स्तरावर यात सामील करून घेणे. 
  • आदिवासी युवकांसाठी उद्योजकता विकास व तंत्रज्ञान: आदिवासी युवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपक्रम आयोजन तसेच तंत्रज्ञानावर त्यांची पकड मजबूत करण्यासाठी उपलब्धता निर्माण करणे. 
read more

Top