भारत सरकारGOVERNMENT OF INDIA
संस्कृति मंत्रालयMINISTRY OF CULTURE
आजच्या वेगवान जगात आणि कठीण स्पर्धात्मक दैनंदिन जीवनात, तरुणांना आपला समृद्ध वारसा आणि भूतकाळ लक्षात ठेवण्यासाठी वेळ मिळणे अवघड आहे. जेव्हा देश आझादी का अमृत महोत्सव (भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे स्मरण) साजरा करतो आहे त्यावेळी ही गोष्ट सर्वात महत्वाची ठरते. भारतातील वसाहतवादी राजवटीविरुद्धचा लढा ही एक अनोखी कथा आहे, आणि ह्या कथेला हिंसाचाराचे गालबोट लागलेले नाही. उलट उपखंडातील शौर्य, धैर्य, सत्याग्रह, समर्पण आणि बलिदानाच्या विविधांगी कथांनी भारलेली ही कथा आहे. या कथा समृद्ध भारतीय सांस्कृतिक वारसा आणि परंपरा घडवतात. अशा प्रकारे आता विस्मृतीत गेलेले जरी असले तरी अशा स्वातंत्र्यवीरांबद्दल फारशी माहिती आपल्याला नसेल असे मात्र नाही. स्वातंत्र्यलढ्यातले ते नेतेही असू शकतात ज्यांच्या आदर्शांमुळे भारताची मूल्यव्यवस्था रेखाटली गेलीय.
हा विभाग आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील विस्मृतीत गेलेल्या नायकांना आठवण्याचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आहे, ज्यांपैकी बरेच जण कदाचित प्रसिद्ध असले तरी नवीन पिढीसाठी अज्ञात असतील. भूतकाळातील धूसर आठवणींच्या रूपात असलेल्या कथा पुन्हा निर्माण करणे आणि पुढे आणण्याचे उद्दिष्ट पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे माध्यम म्हणून काम करेल. भारत 2.0 हे केवळ विकासाच्या कोणत्याही एका विशिष्ट नमुन्यामध्ये भारताच्या अंतसत्त्वाला चालना देण्यासाठी नाही. आपल्या अंतरात्म्याला आणखी समृद्ध करत भारत 2.0 मध्ये जीवनाच्या सर्वच क्षेत्रांचा समावेश आहे. वृद्धी आणि विकासाच्या या प्रवासात आपण आपल्या अशा स्वातंत्र्यवीर नायकांना सोबत घेतल्याशिवाय भारताचा आत्मा अपूर्ण आहे. त्यांचे आचार आणि तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे.
Raghubar Dayal Srivastava
Azamgarh Uttar Pradesh
Karu Bhagat
Jhansi Uttar Pradesh
Sangram Singh
Rudraprayag Uttarakhand
Jangi Lal
Bhojpur Bihar
Rajaram Devji Nikhade
Akola Maharashtra
Rampreet Singh
Patna Bihar
Jagat Singh Kaprawan
Sher Singh Shah
Jamthang Haokip
Kamjong Manipur
Kanta Singh
Bachan Ram Gairola
Sivagami Ammayar
Dharmapuri Tamil Nadu